संगमनेरमध्ये महायुतीच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

संगमनेर (प्रतिनिधी)-
महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करून शहराच्या विकासाला पाठबळ द्या आ.अमोल खताळ यांच्या नेतृत्वा खाली जनतेसाठी तयार करण्यात आलेल्या विकासनाम्याला महायुती सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल आशी ग्वाही खा.डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिली.खा.डॉ शिंदे यांच्या उपस्थितीत हजारो युवकांच्या सहभागाने महायुतीच्या प्रचार रॅलिने चांगला झंझावात निर्माण केला.

महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ यांच्यासह शहरातील पंधरा प्रभागातील तीस उमेदवारांच्या प्रचारासाठी खा.डॉ श्रीकांत शिंदे यांनी विविध प्रभागां मध्ये जावून मतदारांना अभिवादन केले.सकाळी अकरा वाजता खा. श्रीकांत शिंदे यांचे संगमनेर महा विद्यालयाच्या हेलीपॅडवर आगमन झाले.आ.अमोल खताळ आणि महा युतीच्या कार्यकर्त्यानी तसेच उपस्थित असलेल्या हजारो युवकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.पुणे नासिक महामार्गावरून महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महीलांनी भगवे झेंडे घेवून या रॅलित सहभाग नोंदवला .महायुतीच्या विजयाच्या घोषणांनी महामार्ग दुमदुमून गेला.उपनगरातील सर्व प्रभागांमध्ये प्रचार रॅलिचे जोरदार स्वागत करण्यात आले.सुयोगकाॅलनी , मालदाड रोड, जनता नगर,इंदिरा नगर,बस स्थानक आणि गावातील सर्व प्रमुख मार्गावरून निघालेल्या रॅलीत ठिकठिकाणचे कार्यकर्ते सहभागी होत होते.प्रभागातील उमेदवारांना खा.डॉ श्रीकांत शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
संगमनेर तालुक्यातील स्वाभीमानी जनतेने विधानसभा निवडणुकीत आ.अमोल खताळ यांच्या यांच्या माध्यमातून परिवर्तन घडवले .विकासाच्या दृष्टीने हे परीवर्तन महत्वाचे असून तीच परीस्थिती शहरात नगरपालिकेच्या निवडणुकीत आहे.शहरातील सर्व मतदार महायुती च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असा विश्वास खा.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
नगरपालिका निवडणुकीत महायुतीने प्रताराच्या अखेरच्या टप्प्यात मोठी आघाडी घेतली असून शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रचार सभांनी महायुतीच्या प्रचारात मोठा उत्साह निर्माण झाला आहे.
आ.अमोल खताळ यांनी मागील पंधरा दिवसांपासून शहरातील प्रत्येक प्रभागात मतदारांच्या घेतलेल्या भेटी प्रचार रॅली आणि काॅर्नर सभा घेवून प्रचारात झंझावात निर्माण केला आहे.शहराचा विकासनामा जनतेसमोर मांडतांना राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून शहराच्या विकासकामाला अधिक निधी उपलब्ध करून देणार असून काॅटेज रूग्णालय,शहरातील आरक्षण उठविण्याचा प्रश्न जलशुध्दीकरण प्रकल्प औद्यगिक वसाहत निर्माण करण्याचे आश्वासन पूर्ण करणार असल्याची ग्वाही आ.खताळ यांनी दिली आहे.





















