
माजी मंत्री बी.जे. खताळ पाटील यांचे सुसंस्कृत राजकारण व समाजकारण संपूर्ण राज्याला परिचित
मागील अडीच वर्षात सत्ता आल्यानंतर महायुतीच्या माध्यमातून विरोधी उमेदवाराचे तालुक्यातील गैरप्रकाराचे अनेक किस्से आहेत. यामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. खंडणी खोरीचे काम कोणी करत असेल तर ते चुकीचे असून या चुकीच्या कामांना आमचा कधीही पाठिंबा नाही. खताळ अडनाव हे तालुक्यात व राज्यात अभिमानाने घेतले जाते. मात्र आज ते खंडणीखोरीमुळे बंदनाम होत असेल तर ते कधापीही सहन करणार नाही असे ते म्हणाले.
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – माजी मंत्री बी.जे. खताळ पाटील यांचे सुसंस्कृत राजकारण व समाजकारण संपूर्ण राज्याला परिचित आहे. मात्र या आडनावाचा वापर करून विरोधी पक्षाचा उमेदवार प्रशासनावर दबाव निर्माण करत आहे. पालकमंत्र्याच्या माध्यमातून त्यांच्याकडून होत असलेली सेटलमेंट हा काय प्रकार सुरू आहे अशी टीका करताना भाजपकडून तालुक्यात सुरू झालेला धाक व दडपशाही प्रकार निंदनीय असल्याची टीका युवानेते विक्रम खताळ यांनी केली आहे. युवा नेते विक्रम खताळ यांनी नुकताच प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या पार्श्वभुमीवर हॉटेल सेलिब्रेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समवेत त्यांच्या सुविध पत्नी सौ. शिवांगी खताळ होत्या.
यावेळी बोलताना विक्रमसिंह खताळ म्हणाले की, महसूलच्या अनेक कामांची बंदी असताना एका विशिष्ट कुटुंबासाठी नियम शिथिल करणे, महसूल अधिकार्यांवर सातत्याने दबाव टाकणे, जमिनीचे व्यवहार, तलाठी भरतीमध्ये अनेकांकडून पैसे घेतले मात्र ते परतही केले गेले नाही असे अनेक उद्योग फक्त खताळ आडनाव वापरून या मंडळीने केले आहे. हे दुर्दैवी आहे. संगमनेर तालुका हा शांत व सुसंस्कृत विचारांचा आहे. मात्र येथे आता भाजपकडून दडपशाही निर्माण केली जात आहे. खताळ साहेबांचा काँग्रेसचा विचार होता. मात्र समोरचा उमेदवार हा दर सहा महिन्याला पक्ष आणि विचार बदलत आहेत अशा दलबदलू उमेदवाराकडून काय अपेक्षा करणार. त्यांचे अनेक गैरप्रकार आहेत. ते सर्व माध्यमांनी बाहेर काढावे. कोण खरा, कोण खोटा आहे हे सर्वांना माहिती आहे. भाजपाचे व्यक्तिगत टीका करणारे राजकारण आणि दडपशाहीचे राजकारण आपल्याला पसंत नसल्याने आपण भाजपला दूर करून काँग्रेस पक्षात पवेश केला आहे.
यापुढील काळात आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार असून ते जी जबाबदारी देतील ते आपण पार पाडणार आहोत. धांदरफळ गट आणि तालुक्यातील जनता यांच्यामध्ये धांदरफळ घटनेमुळे तीव्र संताप निर्माण झाला. या घटनेवेळी मी वसंत देशमुख यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पुढे बोलतच राहिले. पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा सन्मानच झाला पाहिजे आणि ती परंपरा थोरात आणि खताळ परिवाराने नेहमी जपली आहे. मात्र भाजप महायुतीकडून इतक्या खालच्या पातळीचे राजकारण जर कोणी करत असेल तर ती आपली संस्कृती नाही. त्यामुळे मी धांदरफळ घटनेचा निषेध करतोच मात्र त्याचे समर्थन करणार्या जेवढ्या प्रवृत्ती आहे त्यांचाही निषेध करतो.
विकासाच्या वाटचालीमध्ये सर्वांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचे असल्याचे ते म्हणाले. संगमनेरात या आधी इतके द्वेषाचे आणि टोकाचे राजकारण कधीही नव्हते. मात्र शेजारच्यांच्या नादी लागून हा प्रकार काहींनी आपल्या तालुक्यात सुरू केल्याने अशा प्रवृत्तीला पराभूत करा असे आवाहन विक्रम खताळ यांनी केले.