हरिचंद्र गडावर पर्यटक भरकटल्याने एकाचा मृत्यू

0
1840

परिसरात असणारी थंडी आणि पावसाने प्रकृती खालावल्याने मृत्यू

राजूर प्रतिनिधी-
हरिश्चंद्रगडावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाचा गारठून मृत्यू झाला आहे. मयत पर्यटकाचे नाव बाळू नाथराम गिते (रा.कोहगाव, पुणे ) असे आहे.
याबाबत माहिती अशी की, पुण्याहून सहा तरुण हरिचंद्रगडावर पर्यटनासाठी आले होते. एक ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजलेच्या दरम्यान त्यांनी तोलार खिंडीतून गडावर चढण्यास केली होती, मात्र धुक्यामुळे रस्ता भरकटल्याने दोन दिवस हरिचंद्र गडाच्या जंगलात कपारीत ते मुक्कामाला होते. अशी माहिती मिळाली आहे. हरीचंद्रगड परिसरात सध्या असणारी थंडी आणि पावसाने एका पर्यटकाची प्रकृती खालावल्याने तसेच रात्रभर थंडीने काकडल्याने बुधवारी सकाळी १० वाजता त्या पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. बाळू नाथाराम गीते असे मयत झालेल्या पर्यटकाच नाव आहे. मयत बाळू गीते यांच्यासोबत अनिल मोहन आंबेकर, गोविंद दत्तात्रय आंबेकर, तुकाराम आसाराम तीपाले, महादू जगन भुतेकर, हरिओम विठ्ठल बोरुडे हे सर्व पुण्यातील कोहगाव येथील राहणारे पर्यटक हरिश्चंद्रगडावर येतांना जंगलात रस्ता भरकटले होते. मुंबई येथील एका गृपने गाईड बाळू रेंगडे यास सदर घटनेची माहिती दिली.बाळू रेंगडे हे रात्रीच घटनास्थळी पोहचले. त्यानंतर त्यांनी तोलारखिंड येथील तपासणी नाक्यावरील वन संरक्षक मजूर महादू भांगरे, विजय नाडेकर, गौरव मेमाने, शरद भांगरे आणि राजूर पोलिसांनी पाचनई गावकरी आणि वनविभागाच्या मदतीने मयत व्यक्तीसह बाकीच्या पर्यटकांना गडावरून रेस्क्यू करून खाली आणले असून त्यातील तीन जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत बाळू गीते यांचा मृतदेह तपासणीसाठी राजूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उप निरीक्षक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ.मुंढे व पो. कॉ. सांगळे हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here