पाणी सोडण्यावरून निळवंडे धरणावर शेतकरी आक्रमक

आश्वासनानंतर आंदाेलन तुतार्स थांबले

युवावार्ता (प्रतिनिधी)
अकोले- निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यास विरोध असणारे कार्यकर्ते धरणाकडे जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले. मात्र पोलिसांनी लावलेला अडथळा तोडून आंदोलक धरणाकडे गेले. पाणी सोडण्यावरून धरण स्थळावर मोठा संघर्ष निर्माण झाला होता. मात्र आंदोलनकर्ते व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यत बैठक होऊन आंदोलकांना निश्‍चित आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन थांबले. त्यानंतर महसूलमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते कालव्यांना पाणी सोडून जलपूजन करण्यात आले.
उजव्या कालव्याचे काम पूर्ण करून त्यात पाणी सोडा, तो पर्यंत डाव्या कालव्यातून पाणी सोडू देण्यास या आंदोलकांचा विरोध होता. राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज सकाळी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार होेते. दरम्यान उजव्या कालव्याचे काम पूर्ण करून त्यात पाणी सोडा, तोपर्यंत डाव्या कालव्यातून पाणी सोडू देण्यास धामणगाव आवारी व परिसरातील 8 गावांचे शेतकर्‍यांनी विरोध केला होता. त्यानुसार आज सकाळी आंदोलनकर्त्यांनी निळवंडे धरणाकडे झेप घेतली. या पार्श्‍वभूमीवर निळवंडे धरण स्थळ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. माकप व शेतकरी नेते डॉ. अजित नवले, अगस्ति करखान्याच्या व्हा. चेअरमन सुनीताताई भांगरे, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख महेशराव नवले, तालुकाप्रमुख डॉ.मनोज मोरे, प्रदिप हासे, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यासह आप्पासाहेब आवारी, बाळासाहेब भोर, माधवराव भोर, नामदेव जाधव, गणेश पापळ, विकास बंगाळ यांचेसह प्रमुख कायकर्त्यांना धरण स्थळाकडे कूच करत असतांना रोखले. यावेळी पोलीस व आंदोलनकर्ते यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.


यावेळी आंदोलनाचे नेते डॉ. अजित नवले यांनी धरण अकोले तालुक्यात असतांना, जमिनीही आमच्या शेतकर्‍यांच्या गेल्या तरीही आम्हाला आमच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्याची वेळ येते आहे. पोलीसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न हा अकोले तालुक्याचा अपमान आहे. पाणी नेण्यास आमचा कोणताही विरोध नाही पण आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत असा आग्रह त्यांनी धरला. त्यानंतर ना. विखे यांनी आंदोलकांशी चर्चा करत 30 ऑक्टोबर किंवा दसर्‍याला उच्चस्थरीय उजव्या कालव्यांची टेस्टींग केली जाईल असे आश्‍वासन दिले. त्यानंतर आंदोलन शांत होऊन ना. विखे, माजी आमदार वैभव पिचड, यांच्यासह मान्यवरांनी जलपूजन केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख