शेतकऱ्यांचे पाणी हिरावण्याचा डाव उधळून लावू – आ. खताळ

0
100

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- ज्यांच्या हातात आता राजकारणासाठी कोणताही मुद्दे शिल्लक राहिले नाही. तेच आता आपल्या बगलबच्च्यांना हाताशी धरून हेतूपुरस्सर शेतकर्‍यांत दिशाभूल करणारे वातावरण तयार करत त्यांच्यात विष पेरण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माझी प्रतिमा मलीन करत या निळवंडे पाण्याच्या अडून काही जण राजकारण करत असल्याची जोरदार टीका आमदार अमोल खताळ यांनी माध्यमांशी बोलताना केली.

संगमनेर तालुक्यात निळवंडेचे पाणी पेटले या मुद्द्यावरती आ. खताळ यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता ते म्हणाले, की यापूर्वी जानेवारी महिन्यात देखील निळवंडे उजव्या आणि डाव्या कालव्याला आवर्तन सोडले होते. त्या वेळी कोणतीही अडचण न येता सर्वांना पाणी मिळाले होते. मात्र यावेळी सुद्धा दोन्ही कालव्यांना व्यवस्थित पाणी चालू होते. हेड ते टेलपर्यंत पाणी जाण्यासाठी जलसंपदा विभागाने नियोजन केले होते.
उजव्या कालव्याचे पाणी राहुरी तालुक्यामध्ये अजून पोहोचले नाही. परंतु कालव्यामध्ये एक-दोन पाईप टाकून पुढे नाले बंधारे भरण्याचे काम सुरू होते. मात्र काहींनी तर शेतकर्‍यांना भडकावून देत त्या कालव्यांमध्ये जास्त पाईप टाकून पाण्यावरच राजकारण सुरू केले हे फार मोठे दुर्दैव असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

निळवंडे उजवा आणि डावा कालवा लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकर्‍याला पाणी मिळालेच पाहिजे ही आपली पहिल्या पासून भूमिका आहे. संगमनेर तालुक्या तील दोन्ही कालव्याच्या लाभ क्षेत्रातील गावातील ओढे -नाले, पाझर तलाव भरून देण्याची जबाबदारी माझी आहे. याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना दिलेल्या आहेत. गरज पडल्यास जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्याकडे पाठपुरावा करून 4 ते 5 दिवसाचे रोटेशन वाढवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here