जमजम कॉलनीत सर्रास गोवंश हत्या? स्थानिक आणि हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप
युवावार्ता (प्रतिनिधी)
नांदूर शिंगोटे – पुणे-नाशिक महामार्गावर आज पहाटे दोडी गावाजवळ एका वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर त्या वाहनातून शेकडो किलो गोमांस रस्त्यावर विखुरले गेले. ही गाडी संगमनेर येथून भरून निघाी होती. असे समजते. दरवेळीप्रमाणे याहीवेळी संगमनेरहून भरून आलेल्या गाडीचा सहभाग दिसून येत आहे. संगमनेर शहरातील जमजम कॉलनी येथे गोवंश हत्या सर्रासपणे होत असल्याची वारंवार माहिती स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस प्रशासनाला दिली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
याच आठवड्यात संगमनेर येथून भरून निघालेल्या चार ते पाच गाड्या तालुक्याच्या बाहेर पकडल्या गेल्या आहेत. तरीही संगमनेरमध्ये, जिथे प्रत्यक्ष गोवंश हत्या केली जाते, तिथे कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येते. स्थानिक हिंदू संघटनांचा आरोप आहे की, प्रशासन डोळे झाकून या प्रकारांना समर्थन देत आहे. प्रयत्न करूनही आणि वारंवार माहिती देऊनही जर अशीच परिस्थिती राहिली, तर आम्हाला करो या मरो ही भूमिका घ्यावी लागेल. लवकरच बजरंग दल स्वतः कत्तलखान्यात घुसून कारवाई करेल, असा इशाराही संघटनांनी दिला आहे. प्रशासन याकडे कधी गांभीर्याने पाहणार? आणि संगमनेरमधील अवैध गोवंश हत्या कधी थांबणार? हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.