
या कारणांमुळे मिळू शकते मंत्रीपद
युवावार्ता (प्रतिनिधी)
अकोले – नवनिर्वाचित आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सलग दुसर्यांदा आपल्या कामाच्या जोरावर अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये मोठे यश मिळवले. 2019 सालच्या निवडणुकीमध्ये वैभव पिचड यांचा पराभव त्यांनी केला. 2024 च्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अमित भांगरे, अपक्ष म्हणून वैभवराव पिचड, मधुकर तळपाडे, मारूती मेंगाळ यांचे आव्हान होते. ही बहुरंगी लढत आ. डॉ. किरण लहामटे यांनी अतिशय धाडसाने लढवत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
आ. लहामटे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करून अनेक प्रलंबित प्रश्नांना आणि विकास प्रकल्पांना निधी आणून काम तडीस लावले. आ. डॉ. किरण लहामटे यांना मंत्रीपद का दिले पाहिजे याचा दैनिक युवावार्ता ने घेतलेला आढावा
1) स्वच्छ कारभार – आ. किरण लहामटे यांनी गेल्या पाच वर्षात विविध प्रश्नांसाठी निधी आणू काम तडीस नेले. त्यांची काम करण्याची पध्दत आणि स्वच्छ प्रतिमा मंत्रीपदासाठी साजेशी ठरू शकते
2) जनसामान्यांचा नेता – डॉ. किरण लहामटे हे कोणत्याही सर्वसामान्य माणसात मिसळणारे असून कुठल्याही चहाच्या टपरीवर चहा घेत जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची धमक असणारा नेता म्हणून त्यांची ओळख झाली आहे.
3) प्रश्न सोडविण्याची पध्दत – डॉ. किरण लहामटे हे राजूर येथे जनता दरबार भरवतात. अगदी निवडून आल्याच्या तिसर्या दिवशी त्यांनी पुन्हा जनता दरबार भरवला होता. अकोल्याच्या जनतेला प्रश्न जाणून घेवून लगेच सोडविण्याची क्षमता असणारा नेता मिळाला. या कारणामुळे ते मंत्रीपदाला न्याय देऊ शकतील.
4) बाणेदार आणि कणखरपणा – आदीवासी समाजाचे नेतृत्व करताना विविध ठिकाणी भूमिका घेणे सुध्दा आवश्यक आहे. आदिवासी समाजाचे आरक्षण वाचविण्यासाठी मंत्रालयातून उडी टाकणारा बाणेदार आणि कणखर नेता अशी त्यांची ओळख आहे.
5) एकत्रित काम करण्याची कला – सर्वांना बरोबर घेवून, कोणाचे मन न दुखावता समन्वय साधून काम करण्याची कला डॉ. लहामटे यांच्याकडे आहे.
6) आदीवासींचे प्रश्न सोडविण्याची भूक – आदीवासी समाजाचे नेतृ्तव करून त्यांचे प्रश्न सोडवण्याची भूक डॉ. किरण लहामटे यांच्यामध्ये आहे.
यासारख्या अनेक कामांच्या माध्यमातून आ. डॉ. किरण लहामटे हे सिध्द झाले असून आदीवासी मंत्रालयाचाकारभार ते समर्थपणे सांभाळू शकतात असे सामान्य अकोलेकरांचेमत आहे. आवासीमंत्रीपद मिळाल्यानंतर महाराष्ट्राबरोबरच अकोले आदीवासीबहुल विभागालानक्कीच फायदा होईल.
गेल्या पाच वर्षांत केलेली कामे
1) कोव्हिडमध्ये जनतेची सतत सेवा आणि आरोग्याचे प्रश्न सोडवले
2) 2700 कोटींचा निधी अकोल्याच्या जनतेसाठी उपलब्ध
3) लिंगदेव येथे 50 एकर क्षेत्रावर एसआयडीसीला परवानगी
4) अकोल्याचे छ. शिवाजी महाराज बसस्थानकाचे नूतनीकरण
5) अकोलेच्या बाजारतळाचा बांधकाम आणि कायापालट
6) 17 वर्ष रखडलेल्या पिंपरकणे पूलाचे लोकार्पण
7) अकोले येथे उपजिल्हा रूग्णालयाला मंजूरी
8) राजूर येथे 100 बेडच्या विशेष रूग्णालयाला मंजूरी
9) शेंडी बोटा येथे ग्रामिण रूग्णालयास मंजूरी
10) अकोले येथे सुंदर अशा तहसील कार्यालयाची निर्मिती
11) राजूर कोर्टाची निर्मिती
12) अनेक नवीन रस्त्यांची निर्मिती, पूलांची निर्मिती
13) 29 कोल्हापूर पध्दतीचे नवीन बंधारे
14) 45 पाझरतलाव आणि 72 साठवण बंधार्यांची दुरूस्ती
15) मवेशी, सांगवी, अकलापूर आश्रम शाळेतील विज्ञान केंद्रांना मंजूरी
16) स्पर्धा परिक्षांसाठी विविध ठिकाणी वाचनालये
17) आदिवासी दुर्गम भागात 11 रूग्णवाहिकांचे लोकार्पण
18) जिल्हा परिषद शाळांना नवीन वर्गखोल्या
19) मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजू रूग्णांना मदत
20) वाड्या वस्त्यांमध्ये मंदीरांना सभामंडप उभारणी
21) 25 बुध्द विहारांची आणि कब्रस्तान परिसरात सुविधांची उभारणी