थोरातांच्या प्रयत्नामुळे निळवंडे धरण व कालवे पुर्ण – शरद पवार

1
1011

बाळासाहेबांनी राज्याचे नेतृत्व करावे

आ. थोरात सर्वोत्कृष्ट कृषिमंत्री ठरले
मी देशात कृषिमंत्री व बाळासाहेब थोरात हे राज्यात कृषिमंत्री होते. शेतकर्‍यांसाठी सातत्याने प्रश्‍न मांडणारा त्यांच्यासाठी लढणारा म्हणून देशातील सर्वोत्कृष्ट कृषी मंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांनी काम केले असल्याचे गौरव उद्गार माजी कृषिमंत्री खासदार शरदचंद्र पवार यांनी काढले .

युवावार्ता (प्रतिनिधी)
सत्तेसाठी राहाता- अनेक पक्ष बदलणार्‍यांनी एकेकाळचा समृद्ध राहता तालुका उध्वस्त केला आहे. ही सत्ताधार्‍यांची टोळी उध्वस्त करण्यासाठीच सौ. प्रभावती घोगरे यांच्या रूपाने जनता सरसवली आहे. निळवंडे धरण व कालव्यांची कामे ही फक्त आ. थोरात यांनीच केली असल्याचे स्पष्ट प्रतिपादन खासदार शरदचंद्र पवार यांनी केले आहे. राहता येथील वीरभद्र मंदिरासमोरील प्रांगणात महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ.प्रभावती घोगरे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे नेते आ.थोरात, खा. भाऊसाहेब वाकचौरे, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, राजेंद्र फाळके, करण ससाने, रावसाहेब म्हस्के, सुधीर म्हस्के, बाळासाहेब गायकवाड, अ‍ॅड. नारायणराव कारले, सचिन चौगुले, पंकज लोंढे, सुहास वाढणे, धनंजय गाडेकर, राजेंद्र बावके, आ. रिटा चौधरी, सिमोज जगताप, सुरेश थोरात, नवनाथ आंधळे, डॉ. एकनाथ गोंदकर, लताताई डांगे, शितल लहारे आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार पवार म्हणाले की, लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला मोठी ताकद दिली. यामुळे राज्य सरकार घाबरले असून फक्त घोषणाबाजी करत आहे. महिलांना पंधराशे रुपये देण्याऐवजी सुरक्षितता महत्त्वाची आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर महिलांना तीन हजार रुपये तर बेरोजगार युवकांना चार हजार रुपये भत्ता देणार आहोत. अनेक वर्ष घरात सत्ता असून राहता मतदार संघातील महत्त्वाचा नगर मनमाड रस्ता या लोकांना करता आला नाही. रस्त्यावरून गेले तर सर्वांची हाडे खिळखिळी होतात. शेती महामंडळाची जमिनीवर नॉलेज सिटी साठी उभारण्याचा प्रस्ताव मी दिला होता. पण त्याला स्वार्थासाठी येथील मंडळीने अडथळा निर्माण केला. सत्तेसाठी अनेक पक्ष बदलले. एकेकाचा समृद्ध आणि वैभवशाली असलेला राहता तालुका उध्वस्त यांनी केला. या तालुक्यात दहशतवाद करणारी टोळी निर्माण झाली असून ती जनतेने उध्वस्त करावी. असे सांगताना सौ.प्रभावती ताई घोगरे या शंकर नाना खर्डे व चंद्रकांत दादा घोगरे यांचा समृद्ध वारसा जोपासणारे असून त्या माझी मुलगीच आहे.

राहता येथील शिवाजी महाराजांचा पुतळा अनेक दिवस यांनी बंद करून ठेवला आहे. सिंधुदुर्ग मधील पुतळ्याला मोदींचा हात लागला आणि तो पुतळा कोसळला. महाराजांच्या पुतळ्याचा ही भ्रष्टाचार करणारी ही मंडळी असून यांना त्यांची जागा दाखवा असे त्यांनी आवाहन केले. तर आमदार थोरात म्हणाले की, या तालुक्यातील दहशतवाद मोडून टाकण्यासाठी ही स्वातंत्र्याची लढाई आहे .सर्वांनी सौ प्रभावती ताई घोगरे यांच्या पाठीशी उभे राहून हा तालुका गुलामगिरीतून मुक्त करावा. पेरूच्या बागा असलेला हा तालुका समृद्ध होता. परंतु कारखाना बंद झाला .बाजारपेठ उदास झाली. महागाई बेरोजगारी वाढली. हे सर्व असताना सोयाबीनचे भाव काय आहेत शेतकर्‍यांचे प्रश्‍न आहेत. हे सर्व सोडून जातीयतेच्या प्रश्‍नांवर राजकारण भाजपा नेवू पाहत आहे. सौ घोगरे यांना भाषण बंदीची नोटीस देण्यापर्यंत घाबरले की काय अशी विचारणाही आमदार थोरात यांनी केली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here